सिडनी : कांगारूंविरुद्ध त्यांच्याच भूमीत ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी असले, तरी अखेरच्या सामन्यावर प्रभुत्व गाजवून मालिका ३-१ ने जिंकण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा निर्धार आहे. तसेच रोहितच्या अनुपस्थितीत ऑफ फॉर्म असलेल्या लोकेश राहुल याला संघात स्थान मिळाले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत २-१ अशी आधीच आघाडी संपादन केली आहे. त्यामुळे ही मालिका खिशात घातल्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाचा आलेख अजून उंचावणार आहे.

india vs aus 4th test match india won the toss and elected to bat first