साउदम्प्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. त्यामुळे अखेर इंग्लंडने २३३ धावांची आघाडी घेण्यात यश मिळविले आहे.

त्याआधी इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर नाबाद सहा धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने टीमने अॅलिस्टर कूक, मोईन अली आणि कीटन जेनिंग्स असे ३ गडी गमावले. पुन्हा उपहारानंतर इंग्लंडने चौथा फलंदाज गमावला. जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाला.

त्यानंतर कर्णधार जो रूटदेखील ४८ धावांवर धावचीत झाला. पण अखेर स्टोक्स-बटलर जोडीने दिवसभराचा डाव सावरला. त्यानंतर स्टोक्स आणि बटलर यांनी इंग्लंडला पावणेदोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. भारताने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती.

India vs England text match third day England is in good condition