बंगळुरू : आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत आज आपल्या दुसर्या लढतीत खेळताना बंगळुरूने माजी विजेत्या मुंबईला १८७ धावांतच रोखण्यात यश मिळविले. मुंबईच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली व एबी डी व्हिलियर्सने शानदार फटकेबाजी केली.
परंतु, जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मुंबई इंडियन्सने दिलेले धावांचे लक्ष त्यांना गाठता आले नाही. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या आयपीएलच्या सातव्या सामन्यात बंगळुरूच्या संघाचा मुंबई इंडियन्सने सहा धावांनी पराभव केला. बंगळुरुला वीस षटकात पाच बाद १८२ धावापर्यंत मजल मारता आली. मुंबईचा हा पहिला विजय ठरला.
