डर्बन : एकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार सुरुवात, पहिली वन डे सहज जिंकली. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर वन डे मधील ही दिलासादायक सुरवात म्हणावी लागेल.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत महत्वाची भूमिका पार पाडली. शिखर धवन झटपट बाद झाल्यावर कोहली आणि अजिंक्य रहाणेने मोठी दमदार भागीदारी करत टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुखकर केला. विराट कोहली ने शतक झळकावलं तर अजिंक्य रहाणेने एकूण ७९ धावांची खेळी केली.
रहाणेने ७९ धावांची महत्वाची खेळी करताना ८६ चेंडूत ९१.८६ या स्ट्राईक रेटने दमदार खेळ केला. त्यात एकूण ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
