मुंबई, १९ जून | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी थोड्याच वेळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान झाली आहे. सत्ता गेल्यानं भारतीय जनता पक्षाचा जीव कासावीस झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे, पण अनेकजण आहेत, अनेक मागण्या करत आहेत. दुकाने उघडा, व्यायामशाळा उघडा वगैरे मागणी करतात.. तर आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवंच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला, मराठी माणसाला स्वाभिमान दिला.
स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं, तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा.. माझ्यासाठी स्वबळ हे आहे.. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक असं देखील संवाद साधताना म्हटलंय.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Shivsena Foundation Day CM Uddhav Thackeray LIVE to communicate with party workers news updates.
