7 May 2025 2:26 PM
अँप डाउनलोड

काँग्रेसने देशाला चार गांधी दिले, तर भाजपने तीन मोदी दिले

जयपूर : पंजाब राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी जयपूर येथील प्रचार सभेत भाजपावर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. भाषणादरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारतातून परदेशात पलायन करणारे कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी, ललित मोदी आणि स्वतः नरेन्द्र मोदी यांच्यावरून भारतीय जनता पार्टीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू भाषादरम्यान म्हणाले की, काँग्रेसने आपल्या देशाला ४ गांधी दिले आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. पण दुसऱ्या बाजूला भाजपने ३ मोदी दिले आहेत, एक नीरव मोदी, दोन ललित मोदी आणि तिसरे अंबानींच्या मांडीवर बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. परंतु ही टीका भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भाजप काय प्रतिउउतर देणार ते पहावं लागणार आहे.

येत्या सात तारखेला राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या एकूण २०० जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, राजस्थानची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांवर वाट्टेलती चिखलफेक करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या