नवी दिल्ली: सर्वाधिक वेळ परदेश दौऱ्यात आणि देशभरातील निरनिराळ्या निवडणूक प्रचारात अधिक वेळ खर्ची घालणाऱ्या नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता पूर्णतः संपला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे जरा लक्ष द्या आणि कमीत कमी एकतरी पत्रकार परिषद घ्या, असा उपरोधीक टोला राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

एकूण ५ राज्यांपैकी राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभेचा अखेरचा प्रचार काल बुधवारी संपला आहे. त्यानंतर राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांनी हैदराबादमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. याचाच संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. तुम्हाला पंतप्रधान पदावर येऊन आता तब्बल १,६५४ दिवस झाले आहेत. आता कृपया पंतप्रधान पदावर जरा लक्ष द्या.

काय ट्विट केले आहे काँग्रेस अध्यक्षांनी?

Rahul gandhi twit after telangana and rajasthan election campaign