3 May 2024 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

AUS Vs India तिसरी कसोटी; पहिल्या दिवसअखेर भारत २ बाद २१५

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या दिवसाच्या अखेर सामन्यावर चांगले नियंत्रण राखले आहे. दरम्यान, आजच्या दिवसभराच्या नवोदित मयंक अग्रवालने ७६ तर अनुभवी चेतेश्वर पुजाराने ६८ नाबाद अशा धावा घेऊन भारताला पहिल्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना संघाबाहेर करून मयंक-विहारी हा नवा सलामी जोडीचा प्रयोग भारतीय टीमने केला होता. त्यामुळे हा प्रयोग काहीसा पोषक ठरला आहे असंच म्हणावं लागेल.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने दोन विकेट घेतल्या आहेत. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली ४७ धावांवर नाबाद आहे. भारताने नाणेफेक जिंकून सर्व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर हनुमा विहारीने तब्बल ६६ चेंडूमध्ये ८ धावांची चिवट खेळी केली. तर मयंक अग्रवालने पहिल्याच सामन्यात चांगला खेळ करताना ७६ धावांची खेळी केली. सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x