नवी दिल्ली : राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात काँग्रेसने मोठा गदारोळ केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या भाजप व मोदी सरकारवरच संशय व्यक्त केला.
संसद सभागृहात यूपीएच्या काळात झालेला १२६ विमानांचा करार मोदी सरकारने ३६ विमानांवर का आणला? तसेच या लढाऊ विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि ४५,००० कोटींचं कर्ज असणाऱ्या अनिल अंबानींना हे कंत्राट कसं काय देण्यात आलं? मोदी सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असे अनेक संशय व्यक्त करणारे प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केले आणि मोदी सरकारला कात्रीत पकडले आहे.
Arvind Sawant,Shiv Sena in Lok Sabha: Kaisa offset contractor tha ki jiski company nahi thi abhi, sirf kaghaz pe thi, jab ki HAL ke paas sab tha. Hamari sarkar agar saaf hai to hum kyun darrte hain JPC se? #Rafaledeal pic.twitter.com/qZ6MDXRxKg
— ANI (@ANI) January 2, 2019
