2 May 2025 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

मनसेचे नाव पुढे करून आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? असीम सरोदे

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक कारणं देते आहे.

दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरुन आयोजकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात की, ‘मनसेचे नाव पुढे करून कुणाच्या सांगण्यावरून नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले ? कुणाच्या गैरसोयीचे त्या बोलणार होत्या? आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? यात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात, कट्टरवादी विचारसरणीचा हस्तक्षेप आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न सरोदे यांनी सार्वजनिकरित्या उपस्थित केले आहेत. दरम्यान स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रक प्रसिद्ध करुन स्वतःची आणि पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करून विषय निकाली काढला आहे.

दरम्यान, डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण आम्ही रद्द करीत असल्याचे कळवले आहे. त्यात मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने आम्ही हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे कारण त्यांनी पुढे रेटले होते. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं होतं की एवढा मोठा निर्णय एखाद्या स्थानिक शाखेच्या सांगण्यावर आयोजक कसे काय घेऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करत दुसरीच शंका व्यक्त केली होती.

नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या