रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्रमांक २८ मधील राजीवडा मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपूर्ण कोकणात पक्ष विस्तारावर अधिक भर देताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मजबूत फळी उभी करण्याची पक्षाची योजना आहे.
दरम्यान आजच्या प्रवेशामध्ये पावस जिल्हा परिषद गट टाकलेवाडी येथील समीर पिलणकर, सुशील पिलणकर, विवेक पिलणकर, गणेश पावसकर, महेश भरणकर, उमाजी शिंदे, उदय गुरव, विजय माने, राजेश सुर्वे, मयूर नाईक, सुदेश गजणे, श्रीकांत पावसकर, सचिन पावसकर, प्रदीप शिवणेकर, निथीलेश नार्वेकर तसेच रत्नागिरी शहरातील वॉर्ड क्र. २८ राजीवडा मधील सरफाराज मुजावर, इम्रान वस्ता, समीर वस्ता, जैद सुवर्णदुर्गकर, अजसिद्दीन मुजावर, अकिल सोलकर शाहरुख फनसोफकर, दालीम शेख आदींसह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला.
