नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहीर झाले आहेत. देशातील त्या त्या क्षेत्रातील उत्तुंग आणि भव्य कामगिरीसाठी भारतरत्न पुरस्कार दिले जातात. दरम्यान यंदाचे भारतरत्न तीन व्यक्तिमत्वांना जाहीर करण्यात आले असून त्यात भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, गायक भूपेन हजारिका आणि मराठी सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे.

bharatna award declared for 2019