6 May 2024 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

नितीश कुमार लवकरच बिहार विधानसभा भंग करणार | पण कारण काय?, मोदी-शाहांचं 2024 मधील स्वप्नं भंग करण्याची मोठी योजना

CM Nitish Kumar

Bihar CM Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू’ने एनडीए आणि भाजपाला झुगारून लालू प्रसाद यांच्या आरजेडी पक्षासोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदी पट्ट्यात ही मोठी घटना घडल्याने मोदी-शहा जोडी सुद्धा तणावात असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे आगामी बिहार लोकसभेत भाजपाला मोठा फटका बसणार हे जवळपास निश्चित असल्याने भाजपचे दिल्लीतील नेते बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यानंतर बिहारमध्ये ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या ते देखील देशाने पाहिलं आहे. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने भाजपचे वरिष्ठ अजून चिंतेत आल्याचं वृत्त आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार केव्हाही विधानसभा भंग करू शकतात :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुढील महिन्याभरात केव्हाही विधानसभा भंग करू शकतात असं खात्रीलायक वृत्त आहे. मात्र त्यामागील कारण JDU-RJD मध्ये काही बिनसलं आहे असं अजिबात नाही. उलट JDU-RJD यांच्यासह सर्वच सहकारी पक्षांनी मोठी योजना आखली असून त्याचं नेतृत्व नितीश कुमार यांना देण्यात आलं आहे.

भाजप त्याच ठिकाणी ईडी-सीबीआय कारवाया करत जेथे भाजपाकडे राजकीय सट्टेबाजी करण्यासाठी आमदारांची आकडेवारी असते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नेमकी गोष्ट अधीरेखित करताना भाजपच्या त्याच मुद्याला धोबीपछाड देण्याची योजना आखली आहे. त्यातून महत्वाचे ‘तीन’ हेतू साधले जाणार आहेत, त्यानुसार..

१. विधानसभा भंग करून पुन्हा विधानसभा निवडणूक :
सध्या बिहारमधील राजकीय वातावरण जेडीयू आणि आरजेडी यांच्या बाजूने आहे. त्यामुळे विधानसभा भंग करून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवून भाजपच्या आमदारांची संख्या लक्षपूर्वक १०-१५ वर आणून ठेवणे. त्यानंतर भाजपाला पक्ष फोडणं कठीण होऊन बसेल आणि २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये राजकीय वातावरण नव्याने तयार करून भाजपाला शह देणे. विधानसभा भंग केल्याने निवडणुकीपर्यंत राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्याकडे राहून प्रशासनावर देखील पकड राहील. यावेळेत राज्यातील सर्व सरकारी नोकरीच्या भरती जाहीर केल्या जातील. तसेच अग्निपथ योजनेवरून भाजप विरोधात वातावरण निर्माण केलं जाईल.

२. बिहार निवडणुका गुजरात आणि हिमाचल प्रदेश सोबतच होतील आणि …. :
परिणामी, येत्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसोबतच बिहारच्या निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे एकाबाजूला गुजरात आणि हिमाचल प्रदेशात आप आणि काँग्रेस पक्ष भाजपचं टेन्शन वाढवत असल्याने मोदी-शहा याच सत्ता असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशात अधिक अडकले जातील. पुढे आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेस मिळून बिहारमध्ये भाजपचा खेला करून टाकतील.

३. नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात – हिंदी भाषिक पट्टा लक्ष :
बिहार विधानसभेच्या निकालात फक्त जेडीयू आणि आरजेडीला एकूण २१० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि इतर सहकारी पक्षांना वेगळ्या अधिक जागा मिळतील असा रिपोर्ट अंतर्गत सर्व्हे आणि राज्य पोलीस गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करून ते हिंदी पट्ट्यावर म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यासाठी ते त्या-त्या राज्यातील भाजप विरोधातील प्रमुख राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन जेडीयू नव्हे तर मित्र पक्षांसाठी प्रचाराला मदत करतील. त्यासाठी हिंन्दी पट्ट्यातील जुने समाजवादी नेते आधीच एकमेकांच्या संपर्कात असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

त्यानुसार नितीश कुमार आणि अखिलेश यादव याची महत्वाची भेट होणार असून त्यात नितीश कुमार यांनी लोकसभेच्या दोन मतदारसंघातून उभं राहण्याची योजना आखली जाणार आहे. त्यातील एक लोकसभा मतदारसंघ हा बिहारमधील नालंदा असेल तर दुसरा लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेशातील असेल जो अखिलेश यादव यांच्या बैठकीत निश्चित होईल. त्यामुळे देशाच्या हिंदी पट्ट्यातील पंतप्रधान पदाचा उमेदवार पुढे करून प्रथम बिहार आणि उत्तर प्रदेशात भाजपाला धोबीपछाड देण्यात येईल. तसेच मध्य प्रदेशात, झारखंड, छत्तीसगड येथे नितीश कुमार विशेष केंद्रित राहून मित्र पक्षांसाठी जोरदार प्रचार करून गुजरात लॉबीचा नव्हे तर हिंदी भाषिक पंतप्रधान म्हणून जोरदार हवा निर्मिती केली जाणार आहे.

देशपातळीवरील मोठ्या नेत्यांसोबत चर्चा :
याच राजकीय हालचालींच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात होतं आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे उद्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विशेष चार्टर्ड विमानाने बिहारच्या राजधानीत म्हणजे पटणा येथे बैठकीस दाखल होणार आहेत.

तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश :
नितीश कुमार यांना माहिती आहे की देशातील तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यातील स्थानिक पक्ष भाजपाला डोकं देखील वर काढू देणार नाहीत आणि त्यामुळे येथे जोर लावण्याची गरज नाही. मात्र या नेत्यांसोबत संवाद वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र – भाजपची सत्ता पण राजकीय वातावरण भाजप विरोधात :
कर्नाटकात भाजपाला पराभवाचे अंतर्गत सर्व्हे रिपोर्ट मिळाल्याने चिंता वाढली आहे आणि परिणामी अखेरच्या क्षणी मोदी-शहा यांनी दोन पावलं मागे येत भाजपच्या संसदीय कमिटीत राजकीय दृष्ट्या बाजूला केलेल्या माजी मुख्यमंत्री येदुइराप्पा यांना स्थान देणं भाग पडलं आहे. कारण इथला लिंगायत समाज मोदी-शहा जोडीवर प्रचंड नाराज आहे. मात्र येदुइराप्पा यांना मोदी-शहांचा वापरा आणि फेका स्वभाव कळल्याने ते अखेरच्या क्षणी काय निर्णय घेतात ते पाहावं लागणार आहे. तर नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलामुळे राज्यातील लोकांमध्ये भाजप विरोधात प्रचंड रोष आहे. घडला प्रकार सामान्य लोंकांना पटलेला नाही तसेच त्यात प्रचंड महागाई- बेरोजगारी या मुद्यांची भर पडल्याने भाजपाला मोठा धक्का बसणार याचे संकेत नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेत मिळाले आहेत.

राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात भाजपात मोठा अंतर्गत असंतोष :
राजस्थानमध्ये मोदी-शहांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात एक लॉबी तयार केल्याने येथे भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर उभी फूट पडू शकते असं म्हटलं जातंय. राजस्थान बीजेपी म्हणजे फक्त वसुंधरा राजे असे संदेश थेट बैठकांमध्ये दिले जातं आहेत. तसेच जमिनीवर आणि सामान्य लोकांशी ज्यांची नाळ जोडलेली आहे अशा नेत्यांची फौज वसुंधरा राजे यांच्यासोबत असल्याने तसं झाल्यास येथे भाजपला निवडणुका अत्यंत कठीण होतील असं म्हटलं जातंय. तसेच हिमाचल मध्ये देखील असल्याने येथे भाजपाला सत्ता टिकवणं कठीण असल्याचं म्हटलं जातंय. याची पूर्ण जाणीव आणि अभ्यास नितीश कुमार यांनी केला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यात मोदी-शहांचे रबरस्टॅम्प नेते :
भाजपने अनेक सत्ता असलेल्या काही राज्यांमध्ये केवळ रबरस्टॅम्प नेते म्हणजे मोदी-शहा सांगतील तेवढंच करायचं अशा नेत्यांची फौज उभी केली आहे. परिणामी ज्या नेत्यांची सामान्य लोकांशी नाळ जोडलेली आहे, ते बाजूला फेकले गेल्याने अंतर्गत वादामुळे निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसणार हे दिल्लीतील नैतृत्वाला कळल्याने त्यांची डोकेदुखी अजून वाढली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार :
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच लोकसभेच्या कामाला लागल्या आहेत. राज्यातील राजकारणात टिकायचे असल्यास ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाण्यावाचून पर्याय नसल्याच इथल्या विद्यमान भाजप खासदारांना समजलं असून ते अनेकजण टीएमसी’त जाण्याच्या तयारीत आहेत.

पंजाबमध्ये अस्तित्वच नाही :
भाजपचं पंजाबमध्ये अस्तित्वच नसल्याने येथे लोकसभेत भोपळा कायम राहील हे स्पष्ट आहे. तसेच काँग्रेसचे नेते आणि माजी मुखयमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुढे करून भाजपने केविलवाणा प्रयत्न केला, पण भाजप राहिला बाजूला कॅप्टन अमरिंदर सिंग स्वतःच राजकीय अस्तित्व गमावून बसले आहेत.

मोदी शहांना चिंता – भरपाई करायची कुठून?
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे अंतर्गत सर्व्हे आणि पूर्ण रिपोर्ट आला असून त्यानुसार अनेक राज्यात भाजपच्या लोकसभेच्या जागा कमी होणार असल्याने याची भरपाई दुसऱ्या कोणत्या मार्गाने करावी ही चिंता सतावत आहेत. त्यामुळे बिथरलेल्या मोदी-शहांनी मध्यस्थ नेमून आंध्र प्रदेशातील जुने सहकारी चंद्राबाबू नायडू आणि पंजाबमधील शिरमानी अकाली दलाच्या नेत्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. पण मोदीशहा यांच्या राजकारणाला सर्वांनी ओळखलं असून कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

प्रचंड महागाई आणि बेरोजगारी :
देशात प्रचंड महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे ठळक झाल्याने नितीश कुमार यांचा मार्ग सोपा होणार आहे. याच मुद्द्यांनी मोदींना सत्तेत आणलं होतं आणि हेच मुद्दे आता अधिक गडद झाल्याने मोदी-शहा हिंदुत्वाचा नारा देत आहेत आणि हे नितीश कुमार यांना चांगलं ठाऊक असल्याने ते सुद्धा भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी आखात आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे.

नितीश कुमार ओबीसी नेते :
नितीश कुमार ओबीसी नेते, स्वच्छ राजकीय चेहरा, परिवारवादाची किनार नाही आणि सुशासनबाबू अशी प्रतिमा असल्याने मोदी-शहांना घाम सुटला आहे असं दिल्लीतील वरिष्ठ पत्रकार खाजगीत बोलू लागले आहेत. वरील सर्व मुद्यांच्या नितीश कुमार यांनी अभ्यास करूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे मोदी-शहांच्या अडचणी वाढणार आहेत यात वाद नाही.

थेट ‘गोदी मीडिया’ उल्लेख करत टीका :
देशातील लोकांसमोर सत्य न मांडणाऱ्या आणि भाजप पुरस्कृत वृत्त दाखवणाऱ्या वाहिन्यांवर थेट हल्ला आणि लोकांसमोर या मोजक्या माध्यमांचा चेहरा उघड करण्याची सुद्धा रणनीती आखली गेली आहे. त्यामुळे बिहारमधील आरजेडी आणि जेडीयू नेते पत्रकार परिषदांमध्ये थेट ‘गोदी मीडिया’ असा उल्लेख करताना दिसत आहेत. बिहार भाजप सरकार पडल्यावर अंजना ओम कश्यप यांना घोषणा देत जे घेरलं गेलं तो त्याचाच भाग होता.

नितीश कुमार यांचा फोकस राजकारण करण्यावर भर असेल :
भाजपच्या धार्मिक मुद्यांच्या ट्रॅपमध्ये न अडकता किंवा गुंतून न राहता सामान्य लोकांशी निगडित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून एक फोकस प्रचार करण्याचं नितीश कुमार यांनी निश्चित केल्याचं वृत्त आहे. त्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी, कृषी विषयक मुद्दे आणि ढासळलेली अर्थव्यवस्था प्रचारात केंद्र स्थानी ठेवली जाणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Nitish Kumar may dissolve assembly soon check details 30 August 2022.

हॅशटॅग्स

#Bihar Politics(4)#CM Nitish Kumar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x