मुंबई : मुख्यमंत्र्यांनी काल रात्री मातोश्रीवर जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, सदर बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भारतीय जनता पक्ष २५ तर शिवसेना एकूण २३ जागा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, प्रकृती स्वास्त्य ठीक नसल्याने फडणवीसांनी कालचा वाशिमचा दौरा देखील रद्द केला आणि तसेच मुंबईला परतले. त्यानंतर रात्री उशिरा मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती. आज मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जात आगामी युतीबाबतची घोषणा लवकरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यानंतर माध्यमांना दिले.
काही करून सेना भाजप युतीचा मार्ग मोकळा करा, असा अमित शाहांकडून महाराष्ट्र भाजपला अंतिम संदेश धाडण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले.
