28 April 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

पहिल्यांदा संतप्त वातावरणात वाटण्या आटपून घेतल्या? आता पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे प्रसार माध्यमांकडे वृत्त आहे. पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांच्या बटालियनवर झालेल्या भ्याड हल्लात ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर संतप्त वातावरण असताना भाजप आणि शिवसेनेदरम्यान मातोश्रीवर जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी तापलेल्या वातावरण शिवसेना आणि भाजपने जागावाटपाचा कार्यक्रम आटपून घेतला असल्याचे वृत्त आहे.

त्यानुसार लोकसभेला शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १४४ जागा लढण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आहे. दरम्यान, येत्या २-३ दिवसांत भाजपाध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येऊन बोलणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. तसेच पालघरची जागा आपल्याला देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला भारतीय जनता पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही जागा शिवसेनेला सोडल्याचे वृत्त आहे.

२०१४ साली केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपाने दिलेली दुय्यम वागणूक आणि राज्यात सातत्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने शिवसेनेविरोधात आग्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र राष्ट्रीय पातळीवर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला दोन पावले मागे घेत शिवसेनेशी युतीसाठी बोलणी करावी लागली होती.

दरम्यान, सदर विषयाला अनुसरून मातोश्रीवर जागावाटप सुरु असताना समाज माध्यमांवर सडकून टीका करण्यात आली. देशभर वातावरण तापलेले असताना सत्ताधारी भाजप-शिवसेना जागावाटपात मग्न होते. इतकंच नाही तर प्रकृती ठीक नसल्याचे सांगणारे फडणवीस सर्वकाही विसरून मातोश्रीवर रात्री हजर झाले. त्यामुळे सर्वकाही आधी आटपून घेतलं आणि बाहेर टीका सुरु झाल्याचे दिसताच, पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. याआधी देखील पुलवामा येथे लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला होता आणि त्यावेळी देखील सत्ताधारी सुस्तच होते.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x