रत्नागिरी : मागील ५ वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का? असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर प्रचारसभेत तुफान टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, खासदार नारायण राणे म्हणाले की आमचा पक्ष कोकणासाठी जन्म घेतलेला पक्ष आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय. सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता आमचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही जे काही बोलू, सांगू ते सत्यच सांगू. पाच वर्ष तुम्ही खासदार आहात, सत्तेत आहात मग छातीठोकपणे सांगा एखादा प्रकल्प आणलात, किती लोकांना रोजगार दिलात? असा सवाल त्यांनी यावेळी राऊत यांना केला.
