3 May 2025 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून कडक उन्हाळ्यातील दुपारची वेळ? श्री सदस्यांसाठी कोणतीच सोय नव्हती, पण शिंदे समर्थकांसाठी शाही सुविधा

11 Shri Sadasya dead

11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारी (16 एप्रिल) रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी रुग्णांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली.

रुग्णांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “नागपूरवरून आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. आम्ही थेट इथे आलो. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्यांची भेट घेतली. त्यांच्याशी आम्ही बोललो. मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ… कुणी दिली? कशी दिली? आणि ढिसाळ नियोजन. ही घटना दुर्दैवी आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “चौकशी करतील की नाही, कल्पना नाही. जसं तुम्ही म्हणालात की अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल, तर चौकशी कोण कुणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. पण, तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली असेल, तर खरंच खूप विचित्र प्रकार आहे.

श्री सदस्यांसाठी कोणतीच सोय नव्हती, पण शिंदे समर्थकांची शाही सुविधा
“ज्यावेळी आम्ही इथे पुरूष आणि महिलांना बोललो, तेव्हा बहुतेक जण पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुणे जिल्ह्यातील लोणावळा वगैरे भागातील दिसले. त्यांनी सांगितलं की, आमच्या पोटात काही नव्हतं. काहींनी सांगितलं की, आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्र अतिशय होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली, असं काही जण सांगत आहेत. काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी रुग्णांच्या भेटीनंतर दिली.

एकाबाजूला रसरसस्त्या कडक उन्हात श्री सदस्यांनी खूप आधीच आणून बसवले होते आणि त्यात अनेक चुमुकली मुलं देखील होती. तर दुसऱ्या बाजूला शिंदे समर्थक मोठे नेते सोडाच, साधा नगरसेवक नसलेल्या किंवा पदाधिकारी पदावरील शिंदे समर्थकांसाठी बसायला शाही सोफे, डोक्यावर छत आणि पाठच्या बाजूला थंड गारवा मिळाला म्हणून कुलर बसविण्यात आले होते असं चित्र पाहायला मिळालं.

Shinde

लोणावळ्यातील एक भगिनी भेटली होती. तिने सांगितलं की, तीन चार गाड्या आल्या होत्या. त्यातून कार्यक्रमाला आलो. काही जण 15 एप्रिलला रात्री इथे आलेले होते. मी त्यांना विचारलं की, अंघोळी वगैरे कुठे केल्या, तर त्यांनी सांगितलं की, काही केलं नाही. शौचालयाची व्यवस्था होती, असं त्यांनी सांगितलं”, असंही पवार म्हणाले.

यापैकी आठ मृत व्यक्तींची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. तर, २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २४ व्यक्तींना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मृत पावलेल्या व्यक्तींची नावे
खारघर येथील सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या आणि उष्माघातामुळे मृत पावलेल्यांपैकी 8 महिला असून, 3 पुरुष आहेत. एकूण 11 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
उर्वरित तीन मृतांमध्ये महिला असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.

बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी “हरवले व सापडले” समितीचे प्रमुख ७९७७३१४०३१ व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२२-२७५४२३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 11 Shri Sadasya dead in Navi Mumabi during state government program check details on 17 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#11 Shri Sadasya dead(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या