नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या आणि ७व्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी ६ वाजता अधिकृतपणे पूर्ण झाले असून संध्याकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होणार आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरेंद्र मोदींची पुन्हा सत्ता येणार का, भारतीय जनता पक्ष बहुमताचा आकडा गाठणार का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कशी कामगिरी करणार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, युपी या राज्यात काय होणार, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पाठिंबा देणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलमध्ये केला जाणार आहे.
