28 April 2024 6:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

लोकांनी संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं: शिवाजी आढळराव-पाटील

Shivsena, Shirur, Loksabha Election 2019

शिरुर : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीने दुग्गज नेते शिवाजी आढळराव-पाटील यांना धूळ चारली आणि अमोल कोल्हे खासदार होऊन थेट संसदेत गेले. शिरूर जागा ही शिवसेनेसाठी शंभर टक्के विजयाची खात्री देणारी होती. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात घड्याळाचं अजिबात कर्तृत्व दिसलं नाही तर या मतदार संघात लोकांनी प्रचारात जातीचं राजकारण केलं आणि भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं, असं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचं विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर कठोर शब्दात निशाणा साधला आहे.

तसेच पराभव मान्य असल्याचंही देखील त्यांनी सांगितले. राज्यसभा हा माझा विषय नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही, असं सांगत या चर्चेलाही आढळराव यांनी पूर्णविराम दिला. पराभवानंतरही शिवाजी आढळराव यांचा मागील पंधरा वर्षांत नियमित भरणारा जनता दरबार आजही नेहमीप्रमाणे रविवारीच भरला.

शिरुर लोकसभा मतदार संघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटलं नाही. तर चौथ्यांदा निवडून आलो असलो तर शिवसेनेला महत्वाचं मंत्रिपद मिळालं असतं. हे मंत्रिपद गेल्यानं तालुक्यातील जनतेला दुःख झालं आहे, असं स्पष्टीकरणही यावेळी आढळराव यांनी दिलं. माझ्या पराभवाच वचपा आंबेगावची जनता नक्की भरून काढेल, असं सांगत थेट राजकीय विरोधक दिलीप वळसे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला. यापुढेही जनता दरबार भरला जाईल, अशी स्पष्टोक्ती आढळराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल, पण आपल्या दादाला ज्याने पाडलं त्याचा आंबेगावची जनता समाचार घेईल, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x