3 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

खैरेंचा पराभव हा माझा पराभव; पण शिरूर व रायगडचा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख नाही

Udhav Thackeray, Shivsena, Loksabha Election 2019

जालना : शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा मानहानीकारक पराभव झाला. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना दौऱ्यावर आलेले असताना दिली. मात्र शिरूर लोकसभा आणि रायगड लोकसभा मतदार संघातील अनुक्रमे शिवाजी आढळराव-पाटील आणि अनंत गीते यांच्या बद्दल कोणतेही भाष्य केले नाही. कारण हे दोन नेते देखील पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत.

दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जालना येथे आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राळेगावच्या चारा छावणीला भेट दिली. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

यावेळी लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवाबाबत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, काही झालं तरी औरंगाबाद सोडणार नाही, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. दिल्लीत मला जो काही मानसन्मान मिळत आहे, तो तुमच्यामुळेच मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x