5 May 2024 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

पश्चिम बंगाल राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी जातीय दंगलींच्या उंबरठ्यावर?

Mamta Banerjee, Amit Shah, Narendra Modi

कोलकाता : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली तरी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष विरुद्ध तृणमूल कॉंग्रेस वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. मागील दोन दिवसांपासून उफळलेल्या वादानंतर भाजपाच्यावतीने वतीने आज बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात पुकारण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून हा दिवस काळा दिवस म्हणून पळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष व टीएमसी कार्यकर्ते यांच्यात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.

दरम्यान शनिवारी भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून स्थानिक भाजपा नेते व राज्य पोलीसांमध्ये वाद होऊन वातावरण अधिकच गरम झाले. बशीरहाट येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवल्याने रविवारी रात्री संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली.

बंगालच्या २४ परगना येथे शनिवारी सायंकाळी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. ज्यात कथितरित्या आठ जणांचा मृत्यू आणि अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. तर तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालुन हत्या केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आणि १८ जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमूल कॉंग्रेसच्याही ३ कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. या घटनेमुळे रविवारीही पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण होते.

तसेच वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप पक्ष येथील वातावरण जातीय तिढ्यात गुंतवून दंगली घडवू इच्छित आहे असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x