Bihar Caste Based Census | बिहारमधील जातीय जनगणनेनंतर ओबीसी-ईबीसी हा सर्वात मोठा जातीसमूह आणि त्याचे निकाल यावरून चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात सर्वात मोठी लोकसंख्या गरिबांची आहे. काँग्रेसला आता मुस्लिमांचे अधिकार कमी करायचे असतील आणि ते अधिकार लोकसंख्येने ठरवले असतील तर हिंदूंनी पुढे येऊन मुस्लिमांचे सर्व हक्क घ्यावेत का, असा सवाल मोदींनी केला. त्यानंतर समाज माध्यमांवर मोदींच्या या विधानावरून जोरदार टीका सुरु झाली आहे.

बिहारमध्ये जातीय जनगणना जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभेत याचा थेट संबंध हिंदू-मुस्लिम मुद्द्याशी जोडला आहे. मात्र, त्यांनी बिहारचे नाव घेतले नाही, पण काँग्रेसचे नाव घेतं हे वक्तव्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील गेल्या काही दिवसांपासून जातीय जनगणनेची मागणी करत आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘कालपासून काँग्रेसने वेगळा राग काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, ज्या जातीच्या लोकांची जितकी लोकसंख्या आहे तितका त्यांना हक्क मिळाला पाहिजे. पण मी म्हणतो की या देशात जर सर्वात मोठी लोकसंख्या असेल तर ती गरिबांची आहे. त्यामुळे माझ्यासाठी गरीब ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे आणि गरिबांचे कल्याण हेच माझे ब्रीदवाक्य आहे. विशेष म्हणजे देशात महागाईने गरिबांना अधिक सोसावं लागतंय याचाही मोदींना विसर पडल्याचं पाहायला मिळतंय.

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंचे काय?
काँग्रेसजनांनी लोकसंख्येनुसार हक्क मिळतील का, हे स्पष्ट करावे, मग काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी पुढे येऊन अल्पसंख्याकांचे सर्व हक्क घ्यावेत का? असं अजब प्रश्न त्यांनी प्रचारसभेत उपस्थित केला.

News Title : Bihar Caste Based Census in BJP Rally check details 03 October 2023.

ना महागाई, ना बेरोजगारी! विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांचा हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर भर, कोणती भीती दाखवली मुस्लिमांना?