नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज दिवस आहे. दरम्यान या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक विस्कळीत झालेले दिसत आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलेही पाऊल उचललेले दिसले नाही.
लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली जाऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी. एन. पुनिया यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला प्रचंड धक्का बसला आहे.
