30 April 2024 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? - जयंत पाटील

NCP, MLA Jayant Patil, Sharad Pawar, Farmers, Onion Producers, Devendra Fadnvis, Uddhav Thackeray, Shivsena, BJP Maharashtra

सांगली : कांदा अनुदानावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सरकारवर पुन्हा लक्ष केले आहे. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान ४ महिने १५ दिवस उलटून देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे. राज्यातील कांदा उत्पादक अत्यंत हलाकीच्या आणि अडचणींचा सामना करत असताना देखील राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली पाहायला मिळत नसल्याने आमदार जयंत पाटील यांनी युती सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण राज्यभर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान कांदा अनुदानावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित होते, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

एवढंच नव्हे तर खुद्द अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान साडेचार महिने उलटून देखील बळीराजाच्या बँक खात्यात जमा झालेलं नाही, असा आरोप करत असले सरकार काय कामाचे? असा खडा सवाल देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांस कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x