VIDEO | राजधानी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष वागणुकीचे कौतुक होत आहे. खरं तर या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना पाठिंबा देत स्वत:च्या हाताने खुर्ची धरून बसण्यास मदत केली.
इतकंच नाही तर पंतप्रधानांनी शरद पवारांसाठी बाटली उघडून ग्लासमध्ये पाणी ओतलं. हे पाहून उपस्थित लोक टाळ्या वाजवल्याशिवाय राहू शकले नाहीत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला अध्यात्मिक उर्जाची गरज होती तेव्हा महाष्ट्रातील महान संतांनी ती पूर्ण केली. मराठीतील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनातून समाजाला नवीन दिशा दिली आहे. समृद्ध दलित साहित्य देखील मराठी भाषेने देशाला दिले. तसेच विज्ञान साहित्य दिले. नवीन विचार, नवीन प्रतिभा देखील महाराष्ट्राने दिली.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi and NCP chief Sharad Pawar at the inauguration of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan.
(Source: DD News) pic.twitter.com/W2TJpqyeqv
— ANI (@ANI) February 21, 2025
