29 April 2024 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

फडणवीस-मोदी काश्मीरवर भाषण ठोकत आहेत आणि बाजूच्या गावात शेतकऱ्याची आत्महत्या

BJP, Narendra Modi, Devendra Fadnavis, Farmers Suicide

खामगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा वरवट बकाल व खामगाव येथे आयोजित केली आहे. या सभेपूर्वी शेगाव तालुक्यातील खातखेड येथील राजू नामदेव तलवारे या युवकाने पुन्हा आणूया आपले सरकार हे टी-शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वीच खातखेड येथील या युवकाने आत्महत्या केली.

जळगाव जामोद इथून कामगार मंत्री डॉ संजय कुटे आमदार आहेत. शेगाव तालुक्यातील खातखेड इथं रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे असं 35 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी यवेल्यातही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान, जळगाव येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. हिंमत असेल तर विरोधकांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोदी सरकारने हटवलेलं कलम ३७० पुन्हा लागू करून दाखवण्याचं आश्वासन द्यावं. विरोधकांनी नकराश्रू ढाळणं बंद करावं. लोकांना ते मूर्ख बनवत आहेत. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी कलम ३७० पुन्हा लागू करावं आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर ते वाचतील का? त्यांचं राजकीय अस्तित्व राहील काय? असं मोदी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर तिहेरी तलाक पुन्हा लागू करून दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलं.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x