मुंबई : मंदीने अर्थव्यवस्थेला चांगेलच हैराण केले असून RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नजीकच्या काळात आर्थिक स्थिती आणखी बिकट आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळं येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सुसज्ज राहावे, असा सल्ला दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना दिला आहे.

मंदीचा वाढत दबाव पाहता ‘आरबीआय’ने जीडीपी दराचा अंदाज ५ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष जीडीपी ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला असून तो आणखी घसरण्याची शक्यता बड्या संस्थांनी व्यक्त केली आहे.

RBI ने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. यामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात आलंय. बँकांना तातडीने थकीत कर्ज कमी करण्याचा सल्ला यामध्ये देण्यात आलाय. सध्या देशातील बँकिंग व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारकडून याबाबत अनेक उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत, असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलंय. दरम्यान येत्या काळात महागाईचा आकडा वाढलेला पाहायला मिळणार आहे, असं देखील शक्तिकांता दास यांनी या पत्रकात म्हटलंय.

 

Web Title:  RBI Governer Shaktikanta Das Alerts PSU Banks Chief to Prepared For- Upcoming Financial challenges

सावधान! देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक; आरबीआय’चा बँकांना इशारा