मुंबई: सध्या नाईट लाईफच्या विषयावरून मुंबई शहरातील वातावरण तापलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्लांनिंग मधील नाईट लाईफ हा महत्वाचा प्रलंबित मुद्दा होता. त्यामुळे सरकारमध्ये विराजमान होऊन मंत्रीपद घेऊन त्यांनी प्रथम मुंबईतील नाईट लाईफला मार्गी लावलं आहे. विशेष म्हणजे या विषयावरून सर्वात मोठा ताण हा मुंबई पोलिसांवर पडणार असल्याने विरोधकांनी देखील त्याला विरोध केला आहे.
वास्तविक नाईट लाईफ’च्या निर्णयाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही दिवस राज्याचं गृहमंत्री पद होतं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आयुक्तालयास देखील भेटी दिल्या होत्या. यावेळी पोलीस खात्याच्या आणि पोलीस कुटुंबियांच्या अडचणी समजून घेताना त्यांना पोलिसांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचे वचन प्रसार माध्यमांच्या समोर दिले होते. मात्र, सरकारचे अग्रक्रम नक्की कोणत्या विषयांना आहेत ते समजणं कठीण झालं आहे.
कारण नाईट लाईफ’च्या निर्णयामुळे ज्या पोलिसांवर सर्वाधिक ताण पडणार आहे, त्याच पोलिसांची लाईफ त्याच्या मोडकळीस आलेल्या राहत्या घरात देखील सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. मुंबईतील अनेक पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या सरकारी घरांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं दिसतं. कालच माटुंगा येथील पोलीस वसाहतीत अनेक घरांचे स्लॅब कोसळल्याने पोलीस कुटुंबीय देखील जखमी झाले आहेत. त्यामुळे सरकार पोलिसांना नेमक्या कोणत्या अत्याधुनिक सुविधा मुख्यमंत्री देणार आहेत असा प्रश्न पोलीस कुटुंबीय व्यक्त करत आहेत. सरकारला नाईट लाईफची चिंता आहे, मात्र आमच्या पोलीस कुटुंबीयांच्या लाईफची सरकारला खरंच जाण आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अनेक पोलीस कुटुंबीय अशा मोडकळीस आलेल्या घरांमध्ये जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
#VIDEO – पोलिसांना आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
माटुंगा न्यू पोलिस वसाहतीत A ब्लाक, रुम नं 3, नाव संतोष छतिशे यांच्या घराचा स्लँब कोसळून त्यांचे कुटुंबीय जखमी. pic.twitter.com/PU2AaMdPzp
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) January 20, 2020
Web Title: Police residence Slab collapsed in Matunga Police colony.
