8 May 2025 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकेल: भाजप नेते एकनाथ खडसे

BJP Leader Eknath Khadse, Shivsena Congress and NCP Mahavikas Aghadi

पंढरपूर : सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

तत्पूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या २०१४मधील प्रस्तावावर गौप्यस्फोट केला होता त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना २०१४ च्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. तेव्हा युती नव्हती. भारतीय जनता पक्षाचं एकट्याच्या जीवावर सरकार स्थापन होतंय असं दिसताना, इतर पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया केली असावी. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. सरकार मिळवण्यासाठी किंवा सरकारमध्ये येण्यासाठी असे विविध प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य जबाबदार आहे. त्यामध्ये तथ्य असेल. २०१९ मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही टोकाच्या मतभेदामुळे सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं”.

त्यानंतर ते म्हणाले, ‘ आजही शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार आणि तत्व भिन्न असताना भारतीय जनता पक्षाविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार २०१४ मध्येही झाला असावा. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही कारण दोन्ही पक्ष २०१४ मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते.

 

Web Title:  Shivsena congress and NCP Mahavikas Aghadi will complete 5 years says BJP Leader Eknath Khadse.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ekanath Khadse(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या