बीजिंग: भारतातील केरळ येथे चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर केरळ आणि भारतातील शहरात दक्षता बाळगण्यात येत आहे. याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल; भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणणार.

चीनमधील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चीनमधील भारतीय दूतावासाला केलं आहे. तत्पूर्वी कोरोना व्हायरसचा एक रुग्ण भारतातील केरळमध्ये आढळला होता. या रुग्णावर उपचार सुरु आहेत. परंतु आज एक विशेष विमान चीन मधील वुहान या ठिकाणी रवाना झाले. जे काही वेळापूर्वीच वुहान या ठिकाणी पोहचलं आहे. हे विमान शनिवारी पहाटे सर्व भारतीयांना घेऊन परतणार असल्याची माहिती एअर इंडियचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली.

कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी तेथे दोन विमाने पाठवण्याची विनंती केंद्र सरकारने चीनकडे केली आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी एअरलिफ्टिंगची मोहीम सुरू केली जाऊ शकते. वुहान व परिसरातून पहिल्या विमानात भारतीयांना मायदेशी आणले जाईल. दुसऱ्या विमानात हुबेई प्रांतातील भारतीयांना आणले जाणार आहे.

 

Web Title:  China Corona Virus Indian Government sent special plane to China after WHO Health Emergency announcement.

करोना व्हायरसमुळे आरोग्य आणीबाणी; वुहानमध्ये एअर इंडियाचे विशेष विमान दाखल