8 May 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ - मंत्री जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad, Corona Crisis, Relief package to Mumbai

ठाणे, १४ मे: कोरोनानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईतील स्थितीविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही वारंवार चिंता व्यक्त केली असून, मुंबईसमोर कोरोनाबरोबर आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे. याच विषयाकडे लक्ष देण्यासाठी राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला साद घातली आहे.

चिंतेची बाब म्हणजे चाचण्यांमध्ये देशात पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण सरासरी ३ टक्के असताना मुंबईत हेच प्रमाण १५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशातील हॉटस्पॉट असलेल्या महानगरांपैकी मुंबई वरती आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्याचं चित्र आहे. याकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ असल्याचे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

यानंतर बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच आज पुन्हा निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत.

 

News English Summary: Along with Corona, Mumbai is also facing financial challenges. State Home Development Minister Jitendra Awhad has called on the Modi government to pay attention to this issue.

News English Title: State Housing Minister Jitendra Awhad Demands Special Relief Package For Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x