नाशिक, ३ जून: निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वा-याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किना-याला आणली असून यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे.

दुसरीकडे नाशिकमध्ये पावसाने नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. त्यात अंदरसुलला निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले.

 

News English Summary: Rains have started causing damage in Nashik. In it, Andarsul was seen being hit by a nature storm. Gajanan Deshmukh’s poultry farm in Andarsul Dhamangaon Shiv area was severely damaged by the storm in Andarsul Golhewadi Road area. Trees were uprooted and leaves were blown away in 500 meters of the area.

News English Title: Gajanan Deshmukh poultry farm in Andarsul Dhamangaon Shiv area was severely damaged by the storm in Andarsul Golhewadi Road area News Latest Updates.

नाशिकमध्ये वादळाने पोल्ट्री फार्मचे प्रचंड नुकसान, कोंबड्या उघड्यावर