लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर | मोदी सरकारकडून अखेर कबुली
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट : एकतर्फी कुठलाही बदल न करता सर्व करार आणि सहमतीचा आदर केला तर चीन बरोबर सीमावादावर तोडगा निघू शकतो असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. या मुद्यावर भारताची भूमिका काय आहे ते जयशंकर यांनी स्पष्ट केले. “१९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनाती केली आहे” असे जयशंकर म्हणाले.
लडाखसह सीमेवरील वादामध्ये एकतर्फी तोडगा निघता नये. यामध्ये प्रत्येक सामंजस्य कराराचा सन्मान व्हायला हवा, असे जयशंकर म्हणाले. गेल्या दशकभरात अनेकदा चीनसोबत सीमा वाद उद्भवला आहे. डेपसांग, चूमर आणि डोकलाम. काही ठिकाणी हा वाद वेगळ्या प्रकारचा होता. सध्याच्या वादही अनेक बाबतीत वेगळा आहे. प्रत्येक वादावेळी एकच गोष्ट समोर येते, की तोडगा हा चर्चेद्वारेच काढला गेला पाहिजे. आम्ही चीनसोबत सैन्य आणि राजनैतिक दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहोत. दोन्ही गोष्टी सोबत पुढे जात आहेत, असेही जयशंकर यांनी सांगितले.
सीमा व्यवस्थापनासाठी दोन्ही देशांमध्ये असलेले प्रोटोकॉल आणि आधीपासून असलेले करार त्या आधारावर सीमावादावर तोडगा काढावा अशी भारताची भूमिका आहे. सीमावाद सुरु होण्याआधी लिहिलेल्या या पुस्तकात भारत-चीन भविष्याचे कसे चित्रण केले आहे? या प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, ‘दोन्ही देशांसाठी संबंध खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी रणनिती आणि दूरदृष्टीची गरज आहे’
दरम्यान, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वी सीमेवर य़ुद्धसदृष्य परिस्थिती असल्याचे संकेत दिले होते. सांगितले की, लडाखमध्ये चिनी सेनेला मागे हटविण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरु आहेत. मात्र, सैन्य आणि राजनैतिक चर्चा अपयशी ठरली तर शेवटी सैन्य़ कारवाईचा पर्यायावर विचार केला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले होते.
News English Summary: Foreign minister S. Jaishankar has called the situation in Ladakh the “most serious” since the 1962 conflict. “This is surely the most serious situation after 1962. In fact, after 45 years, we have had military casualties on this border. The quantum of forces currently deployed by both sides at the LAC is also unprecedented,” Jaishankar told Rediff.com in an interview ahead of the release of his book.
News English Title: Ladakh Situation Most Serious Since 1962 Troop Levels Unprecedented Foreign minister S Jaishankar News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा