8 May 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

राज्य सरकारने आता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी | फडणवीसांचा टोला

State government, Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

हिंगोली , २१ ऑक्टोबर: “राज्य सरकारने आता नुसता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी”, असा खोचक सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. रोज प्रसारमाध्यमांमध्ये माईकसमोर येऊन नुसते बोलतात. मात्र, प्रत्यक्षात निर्णय कधी घेणार”, असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. हिंगोली जिल्ह्याचा दौरा सुरू करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारआता जागे व्हायला हवे. सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत कोणतेही गांभीर्य नाही. अशा परिस्थितीतही सरकारमधील नेते फक्त टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा करत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा हा आक्रोश समजून घेऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे”, अशीही मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घ्या,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आम्हाला जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करा ना. लोक इतके अडचणीत आहेत, पण पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has strongly advised the state government to take action instead of just talking nonsense. There are only speaking leaders in the state government. Every day in the media, they just come in front of the mic and talk. However, Devendra Fadnavis also raised the question of when the decision will be taken. Before starting his tour of Hingoli district, Devendra Fadnavis interacted with the media. This time he was talking.

News English Title: State government should now take action instead of talking nonsense says Devendra Fadnavis News Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x