30 April 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

अभिजित भुर्के यांचा 'राजकारणाच्या फडा'वरून थेट 'मनसे' राजकारणात प्रवेश

MNS, Raj Thackeray

मुंबई : आज मुंबईमध्ये मनसेचा शिवतीर्थावर भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. तुफान गर्दी उसळलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. सध्या समाज माध्यमांच्या आधारे देखील सुशिक्षित तरुणांना मनसे सारख्या आक्रमक आणि रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या पक्षात प्रवेश करावासा वाटत आहे, ही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजकारणाचा फड’ या फेसबुक ग्रुपचे मॉडरेटर अभिजित भुर्के यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जरी आक्रमक कार्यकर्त्यांचा असला तरी उच्च शिक्षण घेतलेल्या आणि उच्च पदावर काम करणारे तरुण जर मनसेत प्रवेश करत असतील तर त्यांच्या शिक्षणाचा उपयोग पक्षाची भविष्यातील निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी तसेच तंत्रज्ञान आणि त्याचा नियोजनबद्ध वापर कसा करावा यासाठी करून घेणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळ्या विषयात असते आणि ती पक्षाने ओळखणे आणि त्याला दिशा देणं गरजेचं आहे.

समाज माध्यमांच्या आधारे विविध पक्षातील तरुण अनेक फेसबुक ग्रुप्समध्ये एकमेकांसोबत जोडले जात आहेत. सध्या अनेक फेसबुक ग्रुप्स राजकारणासाठी स्थापन करण्यात आले आहेत, ज्यांचा मूळ उद्देश समाजात विकृती पसरवनं आहे. परंतु असे अनेक ग्रुप्स आहेत जे सामाजिक सलोखा राखण्याचे आणि काय चूकीचं आहे यासाठी देखील काम करताना दिसतात. त्यात ग्रुपच्या ऍडमिन आणि मॉडरेटरची भूमिका महत्वाची असते. ते जरी पूर्णवेळ त्यात नजर ठेवू शकत नसले, तरी वेळेप्रमाणे नियमांचे पालन होतं आहे की नाही किंवा नवे नियम आणून ग्रुप्समध्ये लोकशाही टिकवून ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करताना दिसतात असं आमच्या समाज माध्यमांच्या टीमचा अनुभव सांगतो. त्यातीलच एक ग्रुप म्हणजे ‘राजकारणाचा फड’ असं समजतं.

जगातील कोणतही तंत्रज्ञान नेहमी दोन प्रकारे उपलब्ध असतं, एक म्हणजे वापरणारा त्याचा सदुपयोग करतो की दुरुपयोग. फेसबुकचा दुरुपयोग २०१४ नंतर प्रचंड वाढला असून, आज २० ते २५ वयोगातील अनेक फेसबुक वापरकर्त्यांना देशातील १९९५ पूर्वीचा इतिहासाचं माहित नसल्याने, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करून चुकीचा भारत आणि राजकारण त्यांच्यावर लादलं जात आहे, हे अभ्यासाअंती स्पष्ट जाणवतं. त्यामुळे फेसबुकचा सदुपयोग करून अशा तरुणांचे समाज प्रबोधन करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन फेसबुक ग्रुप्सचा उत्तम सदुपयोग करता येऊ शकतो.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x