20 April 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

व्हिडिओ: युती सरकारविरोधात महाराष्ट्र सैनिक व शेतकऱ्यांचा महासागर लोटला, महिलांचा मोठा सहभाग

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण भागात बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसत असताना भाजप आणि शिवसेना धार्मिक व जातीय मुद्दयांमध्ये मश्गुल झाली आहे. दरम्यान, दुष्काळासारख्या गंभीर मुद्यांवर झोपलेल्या भाजप – शिवसेना सरकारला जागं करण्यासाठी मनसेचा महाराष्ट्र सैनिक आणि मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

मुख्य म्हणजे या दंडुकामोर्चाला कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा अलोट जनसागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर मुद्यावर झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी औरंगाबाद येथे भव्य दंडुका मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मोर्चासाठी येताना स्वत: जवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीमधील सर्व अटींचे तंतोतंत पालन करावे. तसेच कायद्याचा आदर राखावा, असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं होते.

वास्तविक देशभर विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि बजरंगदल अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना मोर्चे आयोजित करताना धारधार हत्यार आणि बंदुका खुलेआम नाचवताना दिसतात. वास्तविक अशा आंदोलनावर कधीही कोणी पोलिसांकडे तक्रार करत नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर भाजप-शिवसेना सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या या “दंडुका मोर्चात” दंडुक्यावरच आक्षेप घेण्यास सुरुवात केल्याने, पोलिसांनी त्यासाठी मनसेला एक नियमावली आखून दिली आहे. कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचे उलंघन न करता या मोर्चाला तुफान प्रतिसाद लाभला आहे.

असा लोटला जनसागर

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x