5 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

राज्याच्या त्या जमिनीवर विकास काम होत आहे | कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही

NCP MP Supriya Sule, Modi Government, Metro 3 Car Shed, Kanjurmarg Land

मुंबई, ३ ऑक्टोबर : मुंबईतील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरुन आता मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये वाद उफाळून आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून केंद्र सरकारला लक्ष केलं आहे.

कांजूरमार्ग येथील मिठागराची ती जागा राज्य सरकारच्या मालकीचीच आहे. तसेच कोणत्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर प्रथम अधिकार हा संबंधित राज्याचाच असतो, असं सांगतानाच दिल्लीतील केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर केला आहे.

सदर विषयाला अनुसरून सु्पिया सुळे पुढे असं म्हणाल्या की, “खरं तर एक अत्यंत धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळली आहे. ही जमीन अधिकृतपणे महाराष्ट्राची आहे. आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते त्याचाच त्यावर अधिकार सर्व प्रथम असतो. आणि यातुन केंद्र सरकारने नवीन काहीतरी शोधून काढलं आहे. ज्या राज्यांचे मूळ अधिकार आहेत ते काढून घेण्याचे पाप देशातील मोदी सरकार करत आहे. त्यांच्या कृतीतून ते स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये केंद्र सरकार जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत आहे हे अत्यंत निंदनीय आहे.

तसेच, राज्यातील विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ती जमीन राज्यातील आहे. त्यावर महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर काम होत आहे. कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही आहे. मग मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा इतका द्वेष का करत आहे हे देखील अजून माहित नाही”, अशी प्रतिक्रिया संतप्त खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

 

News English Summary: A dispute has now erupted between the Modi government and the Thackeray government over the Kanjurmarg site of the Metro 3 car shed in Mumbai. Meanwhile, NCP leaders, a constituent party in the Maha Vikas Aghadi government, have criticized the central government. NCP MP and Sharad Pawar’s daughter Supriya Sule has also slams union government.

News English Title: NCP MP Supriya Sule criticized Modi Government over Metro 3 Car Shed project land at Mumbai Kanjurmarg News updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x