5 May 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या
x

मोदी सरकारच्या अहंकाराने ६० पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला | हट्ट सोडा

Modi governments, apathy and arrogance , 60 farmers Dead, Rahul Gandhi

नवी दिल्ली, ५ जानेवारी: केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारचे औदासीन्य आणि अहंकारामुळे ६० पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी भारत सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता, केवळ विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा. असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तसेच, या ट्विटबरोबर मोदी सरकार हट्ट सोडा, हा हॅशटॅग देखील जोडण्यात आलेला आहे.

दरम्यान, शेतकरी संघटना आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी बैठक पार पडली होती. दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही बैठक सुमारे चार तास चालली होती. पण ही बैठकही निष्फळ ठरली. शेतकरी संघटना तिन्ही कायदे रद्द करणे आणि एमएसपीच्या हमीवर ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने एक तिन्ही कायद्यांमधील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चेची तयारी दर्शवली आहे. आता येत्या शुक्रवारी ८ जानेवारीला दुपारी दोन वाजता पुढील बैठक होणार आहे.

 

News English Summary: The farmers’ agitation on the Delhi border to repeal the new agriculture laws of the central government has been going on for more than a month now. So far 60 farmers have died in this agitation. However, the agitation is still going on as no solution has been reached yet. Against this backdrop, Congress leader Rahul Gandhi has once again criticised the Modi government.

News English Title: Modi governments apathy and arrogance have claimed lives of over 60 farmers said Rahul Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x