5 May 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
x

VIDEO | जवानांच्या मृत्यूवर आनंद | आता रिपब्लिकला राष्ट्रविरोधी म्हणत हाकलण्यास सुरुवात

Congress leader Mani Shankar Aiyar, Republic TV, anti national channel

नवी दिल्ली, १७ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे.

विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. मात्र यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या धक्कादायक आरोपाला दुजोरा मिळाला आहे. कारण देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल एकतर स्वतः लष्कर, पीएमओला आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना माहिती असते. मात्र तीच माहिती अर्णब गोस्वामींकडे कुठून आली. त्यातही पुलवामा हल्ला होताच देशभर दुःख व्यक्त होतं असताना अर्णब गोस्वामी आनंदी असल्याचं त्यांच्या चॅटमध्ये समोर आलं आहे.

त्यानंतर देशभर रिपब्लिक विरुद्ध संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं. समाज माध्यमांवर कालपासून रिपब्लीकला राष्ट्रद्रोही म्हटलं जात असताना आता राजकीय नेते देखील त्यांना राष्ट्रदोही म्हणून हाकलून देत आहेत. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर एका हॉटेलमध्ये लंच करण्यास बसलेले असताना रिपब्लिकचे रिपोर्ट त्यांचा बाईट घेण्यासाठी गेले असता मणिशंकर अय्यर यांनी त्यांना राष्ट्रविरोधी म्हणत थेट हाकलून देत मला जेऊ द्या असं म्हटल्याचे दिसतं आहे.

 

News English Summary: There was an atmosphere of anger against the Republic all over the country. While the Republic has long been called a traitor on social media, political leaders are now dismissing it as a traitor. While Congress leader Mani Shankar Aiyar was having lunch at a hotel, Republican’s report went to take his bite.

News English Title: Congress leader Mani Shankar Aiyar called Republic TV anti national channel news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x