5 May 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी - आठवलेंचा सल्ला

Rahul Gandhi, Hum do hamare, Ramdas Athavale

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी: केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपलं भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. रामदास आठवलेंनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरून टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींना हा मोलाचा सल्ला दिलाय.

दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘हम दो, हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं.

 

News English Summary: Union Minister Ramdas Athavale is always in the limelight due to his speeches and poems. Now Union Minister Ramdas Athavale has given valuable advice directly to Congress leader Rahul Gandhi. Ramdas Athavale advised Rahul Gandhi to get married and implement Hum Do Humare Do. Ramdas Athavale was speaking at a press conference in Pimpri-Chinchwad.

News English Title: Rahul Gandhi should get married to implement hum do hamare do advice from union minister Ramdas Athavale news updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x