मुंबई, १३ मार्च: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनू लागल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धारेवर धरलं आहे. “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. परंतु तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर शरसंधान साधलं आहे. (NCP party has taken care that the Maratha community will go ahead of them till today said Chandrakant Patil)

मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.

तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: In the name of Maratha community, NCP-Congress did politics in Maharashtra for so many years. But the NCP party has taken care that the Maratha community will go ahead of us till today !, ”said Chandrakant Patil.

News English Title: NCP party has taken care that the Maratha community will go ahead of them till today said Chandrakant Patil news updates.

राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली