28 April 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा
x

आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून १४ पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ

नवी दिल्ली : आगामी निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करण्यात आली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि नापिकी सारख्या अनेक प्रश्नांनी होरपळलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर विचार करून अखेर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. धानाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये २०० रुपयांनी वाढ करून ती १८०० रुपये प्रति क्विंटल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी, म्हणजे मागील १० वर्षांपासून हा यात वाढ करण्यात आली नव्हती. २००८-०९ या आर्थिक वर्षात तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने १५५ रुपये इतकी वाढ केली होती.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर ३३, ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे समजते. सरकारकडून वाढविण्यात आलेल्या एमएसपीचे मूल्य जी.डी.पी’च्या ०.२ टक्के इतका आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x