29 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे

India corona pandemic

नवी दिल्ली, १७ मे | करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.

एकाबाजूला कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी कोरोना संसर्गाचे गांभीर्य कमी करणे किंवा मृत्यू टाळण्यासाठी ही थेरपी फार लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील वैद्यकीय निर्देशांतून ही थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी भारतासाठी एक गंभीर इशारा दिला आहे. भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येण्याची शक्यता असून भारतासाठी 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं जागतिक आरोग्य संगघटनेच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी द हिंदू या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या काळात भारतात कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. कोरोनाच्या लढाईत पुढील 6 ते 18 महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं सौम्या यांनी सांगितलं. या व्हायरसचा विकास कसा होतो, त्यावरही बरच काही अवलंबून आहे. व्हेरिएंटसच्या विरोधात व्हॅक्सिनची क्षमता आणि व्हॅक्सिनमुळे होणारी इम्युनिटी किती काळ लोकांचा बचाव करेल, हे खूप महत्त्वाचे राहणार आहे. यात बरंच काही बदलत आहे, असं सौम्या म्हणाल्या.

कोरोना संसर्गाचा निश्चितच अंत होईल. 2021च्या अखेरपर्यंत कोरोनाचा अंत झालेला आपण पाहू शकू. जगातील 30 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही कमी होणार आहे, असं सांगतानाच 2022नंतर लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर वेग येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: The chief scientist of the World Health Organization, Dr. Soumya Swaminathan has mentioned this possibility in an interview given to The Hindu daily. There may be several waves of corona in India in the coming period. Therefore, India’s problems may increase. The next 6 to 18 months are very important for India in the battle of Corona, said Soumya Swaminathan.

News English Title: Corona crisis response over next 6 8 months are critical says WHO scientist Soumya Swaminathan news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x