3 May 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

आसाम'मध्ये घुसखोरांना दणका मिळणार? तब्बल ४० लाख नागरिक बेकायदा घोषित

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर करताच आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रचंड वाढ करण्यात आली आहे. राज्यभर सशस्त्र पोलिसांच्या तब्बल २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या असून बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी या जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्ह्णून पोलीस प्रशासनाने कलम १४४ लागू केलं आहे.

आज आसाममध्ये एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर तर तब्बल ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना थेट बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या त्या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नजीकच्या काळात आसाम धुमसणार अस म्हटलं जात आहे.

दरम्यान हा मसुदा अंतिम नसून आक्षेप असणाऱ्यांना तक्रार करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच त्यांना पुराव्यासहित नागरिकत्व सिध्द करण्याची संधी देण्यात आली आहे, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x