नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी हिंसक घटना घडवून मराठा समाजाचं खराब करण्याचा प्रयत्नं केला असा गंभीर आरोप केला.

नवी मुंबईत तसेच ठाण्यात मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान अनेक हिंसक घटना घडल्या होत्या. परंतु पोलिसांनी केलेल्या अटक सत्रात अनेक अमराठी परप्रातीयांची नावं समोर आली होती. त्यावेळी हिंसक घटनांमुळे आंदोलकांवर प्रसार माध्यमांमधून सुद्धा टीका झाली होती. त्याचाच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयातील गांभीर्य समोर मांडताना सांगितलं की, अनेक परप्रातीयांनी आंदोलनात घुसखोरी करत हिंसक प्रकार घडवून आणले आणि मराठा समाजाचं नाव खराब करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्नं केला.

पुढे बोलताना त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की, वास्तविक त्या परप्रांतीयांचा मराठा समाजाशी किंवा महाराष्ट्राशी काही संबंध नव्हता तरी त्यांनी मराठा समाजाच आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे पोलिसांनी केलेल्या अटक सत्रात सुद्धा समोर आले आहे.

Outsider protestants spoiled the name of Maratha Samaj protestant