5 May 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

प. बंगाल निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढला? | भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच - चंद्रकांत पाटील

Loksabha Election 2024

पुणे, १४ जुलै | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या आधी त्यांनी काही वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे. चंद्रकांत पाटील आज (14 जुलै) कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना दोन्ही काँग्रेसवर टीका केली. 2024मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारचे नाटक चालू आहे:
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. एकाने मारायचं आणि दुसऱ्यानं समजवायचं असा खेळ सध्या राज्य सरकारमध्ये सुरू आहे. हा खेळ न कळण्या इतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. त्याची शिक्षा या सरकारला निवडणुकीत मिळेलच. सरकारचे नाटक चालू आहे. त्याला लोकं विटली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

तत्पूर्वी म्हणजे फेब्रुवारीत चंद्रकांतदादा म्हणाले होते की, “2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं सरकार आलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला 17 कोटी मतं मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपला 22 कोटी मतं तर 303 जागा मिळाल्या. आता 2024 च्या निवडटणुकीत भाजपला देशात 30 कोटी मतं पाहिजेत आणि जागा 400 च्या पुढे जिंकायच्या आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP will win more than 400 seats in Loksabha Election 2024 said BJP Leader Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x