3 May 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

समाज माध्यमांवर एकच हशा! बंद सेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते

मुंबई : आज इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या भारत बंद आंदोलना विषयी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जी टिपणी केली, त्या विधानाची समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणावर खिल्ली उडवण्यात येत आहे. खासदार संजय राऊत आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काँग्रेसचे भारत बंद आंदोलन पूर्णपणे फसले आहे. परंतु हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते, असं विधान केलं आणि त्यांच्या प्रतिक्रियेची समाज माध्यमांनी चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते. तत्पूर्वी शिवसेनेने या बंदला आधीच शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, या बंद खूप घाईमध्ये पुकारण्यात आला होता. तसेच राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण असल्यामुळे बंदसाठी ही योग्य वेळ नव्हती. त्याने लोकांच्या अडचणीत वाढ झाली असती. त्यातही, काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंद पुकारला. त्यामुळे राज्यात हा भारत बंद पूर्णपणे फसला आहे. परंतु त्या तुलनेत यूपी आणि बिहार’मध्ये तिथले प्रमुख स्थानिक राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी झाल्याने तिथे बंद यशस्वी झाला. पण, महाराष्ट्रात शिवसेना रस्त्यावर न उतरल्याने ते शक्य झाले नाही, असे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून हा बंद यशस्वी झाल्याचा दावा केला जात असला तरी, गाड्या फोडणे किंवा दगड मारणे म्हणजे बंद नव्हे. सामान्य जनतेने त्यात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले पाहिजे. जर हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते. तसेच रेल्वे आणि वाहतुकीची इतर साधने बंद राहिली असती, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या