19 April 2024 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

VIDEO | नरेंद्र मोदी, नितीश कुमार आले की पकोडे खायला घाला | राहुल गांधींचं टीकास्त्र

Bihar assembly election 2020, Congress Leader Rahul Gandhi, Modi government, Unemployment

पश्चिम चंपारण्य, २८ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.

एनडीएच्या नेत्यांवर खोटे बोलण्याचा आरोप करत आमच्यात अशी एक कमी आहे की, आम्ही खोटे बोलून त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी रॅलीत स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पकोडे तळण्याविषयी त्यांना आठवण करून दिली. यावर राहुल गांधी यांनी आपले भाषण थांबवले आणि तुम्ही पकोडे बनविले आहेत का? असा सवाल त्या व्यक्तीला केला. तसेच, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार पुढील वेळी आले की त्यांना पकोडे खायला घाला, असे राहुल गांधींनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत असताना उर्वरित टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराच्या तोफा चांगल्याच तापल्या आहेत. पश्चिम चंपारण्य येथे झालेल्या जाहीरसभेत सभेत कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. “काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?,” असा सवाल राहुल गांधी यांनी मतदारांना केला.

राहुल गांधी यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह पश्चिम चंपारण्य येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले,”एरवी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. पण यावेळी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानींचे पुतळे जाळण्यात आले. या दसऱ्याला संपूर्ण पंजाबात नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचे पुतळे जाळले गेले. ही वाईट गोष्ट आहे, पण शेतकरी त्रस्त आहे म्हणून हे घडलं आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

 

News English Summary: Addressing his election rally at Champaran, Congress leader Rahul Gandhi on Wednesday doubled down on BJP-JD(U) for “destroying” Bihar as polling is underway in 71 constituencies of the state in the first phase of Bihar Assembly Election 2020. “When Prime Minister Narendra Modi came here last time he promised that a sugar factory will be set up here and he will have tea with you all. Do you remember? Did he have tea with you?” Rahul Gandhi said. The Congress leader said he was surprised to see Prime Minister Narendra Modi’s effigies getting burnt in Dussehra in Punjab. This is sad and should not happen as he is the prime minister of the country, but this how Punjab farmers feel about him, Rahul Gandhi added.

News English Title: Bihar assembly election 2020 Congress Leader Rahul Gandhi slams Modi government over unemployment News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x