5 May 2025 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर घसरली.

Narendra Modi, PM Narendra Modi, Amit Shah, Indian Economy, World Bank

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे कि भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान पाच ट्रिलियन डॉलर इतके व्हावे. परंतु याच आठवड्यात जागतिक बँकेच्या २०१८ च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या वरून सातव्या क्रमांकावर घसरली आहे. २०१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २. ट्रिलियन डॉलर होते. २०१८ मध्ये वाढ होऊन हा आकडा २.७३ इतका झाला.

पण क्रमवारीत मात्र भारताची घसरण झाली आहे. या घसरणीचे कारण म्हणजे २०१८ मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अधिक सक्षम स्थितीत राहिली. भारत ब्रिटन ला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर जाईल असे बोलले जात होते. परंतु ब्रिटन आणि फ्रान्सनेच भारताला सातव्या क्रमांकावर ढकलले आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. याचाच सगळ्यात मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. ऑटोमोबाईल उद्योगाच्या घसरणीकडे सगळ्यात काळजीची बाब म्हणून बघितले जात आहे.

यामुळेच वाहन निर्मिती करण्याऱ्या काहींनी तर उत्पादन बंद करण्याची घोषणा दिली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहनांच्या मागणीमध्ये होणारी घट. तसेच भारतातील बेरोजगारी व गरिबी हे देखील भारतातील अर्थव्यवस्थेवर परिमाण करणारे घटक आहेत. अर्थव्यवस्थेच्या आकारमानात झालेल्या वाढीचा अर्थ असा नाही कि लोकांचे जीवनमान सुद्धा त्याचप्रमाणे वाढत आहे. भारताचे आकारमान लक्षात घेता लोकसंख्येच्या आधारावर पहिले तर दरडोई उत्पनात आणि गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्येत हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असली तरीही भारतापुढे गरिबीचे आव्हान अजूनही कायम आहे. आणि यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या