Bachchan Property Dispute | 2011 साली अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका वाहिनीला इंटरव्यू दिला होता. या इंटरव्यूमध्ये बिग बींनी त्यांच्या प्रॉपर्टीचे एकूण किती हिस्से होणार? याबद्दल सांगितलं आहे. दरम्यान बिग बिंच असं उत्तर होतं की, ‘मी माझ्या प्रॉपर्टीचे दोन्हीचे करणार. मी एका गोष्टीचा ठामपणे विचार केला आहे तो म्हणजे माझ्या दोन्ही मुलांमध्ये मी कधीच भेदभाव करणार नाही. त्यामुळे माझी प्रॉपर्टी माझ्या दोन्ही मुलांमध्ये समान वाटली जाईल’. असं अमिताभ यांनी त्यावेळी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले होते की,’ मी आणि जयाने खूप आधीच बोलणं केलं होतं. आपल्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से होणार. जे मुलगा आणि मुलीला समान विभागले जाणार. लोक म्हणतात मुली परक्याचं धन असतात. त्या लग्न करून नवऱ्याच्या घरी जातात. परंतु आमच्या नजरेमध्ये आमची मुलगी आहे आणि तीला सुद्धा हा अधिकार आहे’.

दरम्यान अमिताभ यांच्या निधनानंतर ऐश्वर्या रायच्या हातात काहीच उरणार नाही असं चित्र आतापासूनच पाहायला मिळतंय. कारण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये फारसं काही चांगलं चाललेलं नाही असे मेसेजेस सोशल मीडियामार्फत पसरत होते. परंतु असं काहीच नाही आमचं सगळं व्यवस्थित आहे अशा पद्धतीचा मेसेज अभिषेकने देतं खुलासा केला आहे.

अमिताभ यांच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर, अमिताभ केबीसीनंतर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटामध्ये झळकले. यामध्ये त्यांनी ‘अश्वत्थामा’ हे पात्र साकारलं होतं आणि त्यांचं हे पात्र प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलं होतं. सध्या अमिताभ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. त्यांची प्रॉपर्टी संबंधीची बातमी कळताच अनेकांच्या मनात ऐश्वर्यासाठी प्रश्न उपस्थित झाला आहे.

News Title : Bachchan Property Dispute Role of Aishwarya Rai Bachchan 05 September 2024.

Bachchan Property Dispute | अमिताभ यांच्या निधनानंतर संपत्तीचे होणार दोन हिस्से; ऐश्वर्याला काही मिळणार की नाही?